बागेत पेरू,चिक्कू,अंजीर आहेत पण हे तिकडे फिरकलेच नाहीत.
काय कारण असाव?
माकड म्हणजे आपले पूर्वज अस म्हटल जात पण त्यातल्या कुठल्या जातीशी आपल साधर्म्य आहे ,बहूतेक चिंपाझी असावे का?जेन गुडाल हिच्या अभ्यासात ती सांगते कि मानव व चिंपाझी याच्यात फक्त एका गुण सुत्राच्या जोडीमुळे ते चिंपाझी आणि आपण मानव ठरलो.
यात बरच संशोधन झालाय आणि सध्या सूरू ही आहे.
माकड आपल्याला जास्त परिचयाची कारण आपल्या आसपास बरयाच दा आढळतात.काही ठिकाणी मंदीरात ही ते दिसून येतात.हनूमानाचा अवतार म्हणून लोकां कडून त्यांची बरयाच ठिकाणी बडदास्त ठेवली जाते.
माकडांच्या बाबतित मागे एकदा मारूति चितमपल्ली यांच्या नावानी एक पोस्ट फिरत होति त्यात ते लिहितात कि दुष्काळाची चाहूल माकडानां आधिच लागते आणि म्हणून वयस्कर माकड काही पानांचा चोथा करून त्याचे लाडू ( तहाण लाडू भूक लाडू सारखे) आपल्या मुलां सीठी साठवूण ठेवतात.
व हे अन्न सगळ्यां ना पुरणार नाही म्हणून वयस्कर माकड आपला जीव देतात जेणे करून उरलेल्या तरूण ,लहाण माकडांना ते पुरेल.
प्राण्यांच जग गुढ आहे ,ते काय? काय? कस ?कस? करतात याचा अभ्यास करणारया बरयाच अवलियांनी आपल्या आयुष्यातिल अनेक वर्ष त्यांच्या सोबत घालवून केलाय आणि त्या साठीची चिकाटी ,त्याग तसे तपस्विच करू शकतात. त्यांच्या मुळेच आपल्या पर्यतं या गोष्टी पोहचतात .सो धन्यवाद त्या सगळ्या महान तपस्व्यांना.🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा