सोमवार, २९ मार्च, २०२१

काहीच निरूपयोगी नाही

 

     ही अंजीराची फांदी,ज्याला वाळवी लागली म्हणून कापल,  बरेच दिवस झाले ,ते तसच पडून आहे .

      त्याच्या खाली पावडर सारख पडत होत म्हणून बघायला गेले तर ,त्यावर शंख दिसले आणि वाटल वाळवी लागली म्हणून झाडा  वेगळी केलेली फांदी ,त्यावर अजून काही जीव वाढताहेत

   शंख पाण्यात वाढतात असच वाटायच पण हे काय ?या मागच शास्र काय असेल . कमळाच्या पाण्यात आहेत ते शंख वेगळेच आणि हो स्नेंल्स् मुळे वेगळेच शंख हेही बागेतच .


  प्रत्येक शंखाचा रंग वेगळा ,रूपही वेगळे .पण हे मात्र नक्की की निसर्गातिल टाकून दिलेली प्रत्येकच गोष्ट कामाची असते ति दुसरया कुणाला काही तरी देऊन जाते अगदी गळलेले पान खत होत ,लाकडाची राख ही पोशन देते ,वाळलेली फुलं ही बरच काही देऊन जातात .नारळाला कल्पतरू म्हणत असलो तरी निसर्गातिल प्रत्येकच निर्मिती तिच्या पूर्ण नष्ट होई पर्यंत उपयोगाची असतेच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

क्लिओम व्हिस्कोसा(cleome viscosa )

 क्लिओम व्हिस्कोसा या वनस्पतीला मराठीत तिळवण किंवा पिवळी तिळवण अस ही म्हणतात.या वनस्पतीला एशियन स्पायडरफ्लावर किंवा टिक विड असही म्हटल जात.ह...