हे वाचल्या वर संक्रात वेलीची आठवण झाली ,
या वेळी खुप दिवस लांबलेला पावसाळा त्या मुळे गवत ही ऊशिरा काढल आणि वाढलेल्या वेलीं ची कटींग ही ऊशिराच केली पण मग त्याला बहार यायच्या सिझन मधे तो आलाच नाहि.संक्रात वेलीला फुल साधारण डिसेंबर मधे येतात व पुढे फेब्रुवारी पर्यंत त्या वर बहर असतो.
सुंदर केशरी रंगाचे लोंबकळते फुल ,झुबके डोळ्याच पारण फेडतात .
पण या वर्षि वाटल आपण उगाचच ते कापत बसलो , सगळी कडे संक्रात वेलीवर फुलं आहेत आणि आपल्याच नाहीत .मन खट्टु झाल कारण ज्या गोष्टीची वाट बघत असतो ति वेळेवर दिसली नाहितर वाईट वाटत.
बरेच दिवस तिकडे लक्ष दिल नाही ,त्याला आता पुढच्याच वर्षी फुल येतिल हे मनोमनी स्विकारल.
पण अचानक त्याला कळ्या दिसल्या
थोडिशिच का होईना पण संक्रात वेल बहरली ,म्हणून तर हे वाचल्या वर वाटल बहर येण्या पासून कोणिच थांबवू शकत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा