ही अंजीराची फांदी,ज्याला वाळवी लागली म्हणून कापल, बरेच दिवस झाले ,ते तसच पडून आहे .
त्याच्या खाली पावडर सारख पडत होत म्हणून बघायला गेले तर ,त्यावर शंख दिसले आणि वाटल वाळवी लागली म्हणून झाडा वेगळी केलेली फांदी ,त्यावर अजून काही जीव वाढताहेत
शंख पाण्यात वाढतात असच वाटायच पण हे काय ?या मागच शास्र काय असेल . कमळाच्या पाण्यात आहेत ते शंख वेगळेच आणि हो स्नेंल्स् मुळे वेगळेच शंख हेही बागेतच .
प्रत्येक शंखाचा रंग वेगळा ,रूपही वेगळे .पण हे मात्र नक्की की निसर्गातिल टाकून दिलेली प्रत्येकच गोष्ट कामाची असते ति दुसरया कुणाला काही तरी देऊन जाते अगदी गळलेले पान खत होत ,लाकडाची राख ही पोशन देते ,वाळलेली फुलं ही बरच काही देऊन जातात .नारळाला कल्पतरू म्हणत असलो तरी निसर्गातिल प्रत्येकच निर्मिती तिच्या पूर्ण नष्ट होई पर्यंत उपयोगाची असतेच.